प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 2 March 2026

आठवण



दशके सरली तरी तुझी आठवण आली नाही,
असं असूनही तुझी आठवण कधी ओसरली नाही।

विस्मरणाचा धीर मनाला कधीच जमला नाही,
दूर असूनही तू मनातून कधी दूर झाली नाही।

काळाच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो,
मनातल्या आपल्या त्या विणीची गाठ तुटली नाही।

ओठांवर शांतता, डोळ्यांत ओल दाटून आली,
दुःखाची सल जिवघेणी तरी ओढ अंतरी विरली नाही।

‘मेघ’ म्हणे, अंतर वाढले तरी नातं तुटलं नाही,
डोळ्यांआड असूनही तू स्मरणातून गेली नाही।

शनिवार, २८/०२/२०२६ | ११:४५ PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

No comments:

Post a Comment