दशके सरली तरी तुझी आठवण आली नाही,
असं असूनही तुझी आठवण कधी ओसरली नाही।
विस्मरणाचा धीर मनाला कधीच जमला नाही,
दूर असूनही तू मनातून कधी दूर झाली नाही।
काळाच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो,
मनातल्या आपल्या त्या विणीची गाठ तुटली नाही।
ओठांवर शांतता, डोळ्यांत ओल दाटून आली,
दुःखाची सल जिवघेणी तरी ओढ अंतरी विरली नाही।
‘मेघ’ म्हणे, अंतर वाढले तरी नातं तुटलं नाही,
डोळ्यांआड असूनही तू स्मरणातून गेली नाही।
शनिवार, २८/०२/२०२६ | ११:४५ PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

No comments:
Post a Comment