प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 7 March 2026

रात्र पावसात भिजली


रात्र पावसात भिजली, तरी मन कोरडेच राहिले,
मन भरलं नाही अजून, आपलं बोलणंच राहिले।

पाऊस रिपरिपत होता, डोळे डबडबले होते,
तुला सांगायचं होतं मनातलं, ते तसेच राहिले।

गळ्यात कण्हत होती एक अगम्य वेदना,
ओल्या रिमझिमीतही शब्द माझे कोरडेच राहिले।

हातात हात घेऊन वाट पाहिली मी त्या क्षणाची,
सरींमध्ये भिजूनही स्पर्शात ते आमंत्रणच न राहिले।

तुझे स्मित ते मोहक, मन हरपून गेले,
घर आपलं आजही तुझी वाट पाहते, ते रिकामेच राहिले।

पाऊस बरसला आणि रात्र भिजली माझी,
कोणास ठाऊक का तरी ओठ कोरडेच राहिले।

शनिवार, ७/२/२६ , ९:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment