रात्र पावसात भिजली, तरी मन कोरडेच राहिले,
मन भरलं नाही अजून, आपलं बोलणंच राहिले।
मन भरलं नाही अजून, आपलं बोलणंच राहिले।
पाऊस रिपरिपत होता, डोळे डबडबले होते,
तुला सांगायचं होतं मनातलं, ते तसेच राहिले।
गळ्यात कण्हत होती एक अगम्य वेदना,
ओल्या रिमझिमीतही शब्द माझे कोरडेच राहिले।
हातात हात घेऊन वाट पाहिली मी त्या क्षणाची,
सरींमध्ये भिजूनही स्पर्शात ते आमंत्रणच न राहिले।
तुझे स्मित ते मोहक, मन हरपून गेले,
घर आपलं आजही तुझी वाट पाहते, ते रिकामेच राहिले।
पाऊस बरसला आणि रात्र भिजली माझी,
कोणास ठाऊक का तरी ओठ कोरडेच राहिले।
शनिवार, ७/२/२६ , ९:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment