गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी,
चंद्राच्या चांदण्यांसारख्या आपल्या मनी।
त्या आठवणींसोबत जगू — तू आणि मी।।
चंद्राच्या चांदण्यांसारख्या आपल्या मनी।
त्या आठवणींसोबत जगू — तू आणि मी।।
शब्द सारे विरून जातील काळाच्या प्रवाहात,
नातं आपलं राहील तरी एकमेकांच्या सहवासात।
हा सहप्रवास टिकवून ठेऊ — तू आणि मी।।
ऋतू जरी बदलले, वाटा जरी दूर गेल्या,
मनातली ओढ तरीही विरणार नाही।
त्या ओढीची विण जपू — तू आणि मी।।
सुखदुःखांच्या लाटांनी किनारे जरी झिजवले,
काळाच्या वादळांनी दिवस कितीही बदलले।
हातात हात घट्ट घेऊन चालू — तू आणि मी।।
प्रेम हृदयात उमलते, पण डोळ्यांत फुलते,
दोघांच्या डोळ्यांतही ते स्पष्ट दिसते।
उघड्या डोळ्यांनी जगू — तू आणि मी।।
जन्मोजन्मीची ही साथ आपली,
आत्म्याची आत्म्याशी गाठ आपली।
जन्मोजन्मी भेटत राहू — तू आणि मी।।
सोमवार, २५/५/२०२६, रात्री १०:००
अजय सरदेसाई — ‘मेघ’
