प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 28 March 2026

तीन ऋतू तीन तर्हा

 

तीन ऋतू तीन तर्हा
धर्म वेगळे,वेगळी ओळख
हिरवा, रखरखीत, पानगळ

ऊन्हाळा गरम
पावसाळा चिंब
हिवाळा थंड

ठरवलं एकदा तिघांनी
करु आपण बंड

ऊन्हाळा झाला चिंब
घामाने
पावसाळा झाला थंड
पाण्याने
हिवाळा झाला गरम
चहाने

बदलले काहीच नाही
ना धर्म ना ओळख
नावं ही नाही

शनिवार, २८/३/२६ , २:०० PM
अजय सरदेसाई -मेघ