सत्यास सामोरे जाताच,बोलणेची खुंटले,
जुन्या आठवांचे उरले सागरात (आयुष्य ) शिंपले,
आयुष्याच्या जात्यात दळण झालो आपण,
सुंभ 'मी' चा गेला जळून तरी पिळ अजून उरले.
होते उबदार एक आपुले ही घरटे (घर ते),
पाखारांच्या किलबिलाटाने भरलेले घरटे (घर ते),
पंख फुटले त्यांना,गेले सोडून घरटे (घर ते),
आता उरले ते फक्त दोघांचे घरटे (घर ते).
चल सांभाळू जपून आपण हे घरटे (घर ते),
सोनेरी क्षणांनी हे भरलेले घरटे (घर ते),
भेटण्यास येतील दमुन पुन्हा आपली पाखरे घरट्यात,
ठेऊ त्यांच्या साठी मऊ उब या घरट्यात..... मऊ उब या घरट्यात......
मंगळवार, १०/३/२६ , ९:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ
