उजेडाचे कवडसे जपून ठेवले मी।
रात्र खूप निबिड, काळोखाची होती,
काजव्यांना ओंजळीत जपून ठेवले मी।
वाटेत चुकलेल्या पावलांच्या खुणा होत्या,
स्वप्नांना हलकेच मशाली करून ठेवले मी।
विझलेल्या स्वप्नांच्या गरम राखेतून,
नव्या पहाटेच्या ठिणग्या पेटवून ठेवल्या मी।
जखमा जरी खोल मनात होत्या,
त्यांनाही फुलांचे आवरण दिले मी।
तू नसतानाही तुझ्या अस्तित्वाला,
श्वासांच्या स्पंदनांत अलवार ठेवले मी।
शनिवार, २१/३/२६ , ०७:१७ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment