भोगता-भोग्य एक झाले, गाथा संपली तिमीराची,
शमली सर्व गात्रं-गात्र, होती रात्र अमृताची।
शमली सर्व गात्रं-गात्र, होती रात्र अमृताची।
जे का दिसते भासते, असतेच का ते सत्य?
निर्विकल्पांत गेलो जेव्हा, मिटले सर्व मिथ्य।
कोण असे ह्या ब्रह्मांडाचा अनभिषिक्त स्वामी?
आंत जाऊनी पाहिले जेव्हा, दिसलो फक्त मीच।
‘मी’स जाऊन शोधले अजून खूप खोल,
उरली जाणिव अस्तित्वाची फक्त, नव्हते कुणीच।
देखावा तो कसा होता, वर्णू कसे ते अंबर,
जणू अंबराच्याच कुशीत निजलेले एक अंबर।
शनिवार, २१/२/२६, ३:३२ PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

No comments:
Post a Comment