आकाशांत मेघ सैरभैर, चौफेर पळत होते,
पाण्याचा थेंबही न पडला, सर्व कोरडेच होते।
पाण्याचा थेंबही न पडला, सर्व कोरडेच होते।
हलकेच फुलांवर बसते, मन फुलपाखरू होते,
फुलांच्या अनुरागांतून फूलतात निखारे नुसते।
हातात कुंचला होता, शुभ्र कॅनव्हास पुढ्यात,
कसलीच सक्ती नव्हती, मी सोडला पाण्यात।
रात्र सरली होती, होता हवेत गारवा,
अश्या ह्या प्रहरी मी आळवत होतो मारवा।
ओठांशी येऊन थांबले, ओंजळीभर शब्द होते,
सांगावंसं खूप काही, पण शब्दच फुटत नव्हते।
गूरूवार, १९/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment