कितीदा सांग तुला
माझी आठवण आली,
कितीदा सांग तू
मज भेटण्यास आली.
कितीदा आयुष्यात
धडपडलो मी,
सांग तू कधी मज
सावरण्यास आली.
कदाचित आपल्या
वाटा वेगळ्याच होत्या,
म्हणून तुझ्या
येण्याची चाहूलही न आली.
रात्रभर तिष्ठत
बसलो वाट तुझी पाहत,
झाल्या अस्त
चांदण्या, पण तू न आली.
किती धरशील आस
वेड्या मना रे,
न येणार ती, जरी वेळ निघण्याची आली.
गातो मी आता
तुझ्या आठवणींची गाणी,
गाता गाता
आयुष्याची संध्याकाळ आली.
शनिवार, २४/१/२६ , ०९:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment