प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 31 August 2013

तुझ्या आठवणी



किती वसंत येउनि गेले किती गुलमोहर मोहरूं गेले ,

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

किती रांत्री एकल्या वेचिल्या, चंचाला मज रीझवून गेल्या ,

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

विरहाचा हा असीम प्याला, एकटाच मी आहे प्यायला .

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

मावळत्या ह्या माझ्या मनाच्या, दुखवून गेल्या झुन्या खपल्या

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

शरीर ही मझे थकले आता , दृष्टी ही लागली  पैलतीरा.

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी


अजय सरदेसाई (मेघ)
13/09/94                                              11.45 PM

No comments:

Post a Comment