प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....
Showing posts with label bhav geet. Show all posts
Showing posts with label bhav geet. Show all posts

Wednesday, 23 July 2025

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी

 



हृदयीच्या भावना या गुंफू कशा शब्दांत,

हृदयीची स्पंदने विरली पुन्हा हृदयात.

दुःख हृदयीचं गाते मुक गाणी,

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

 

हे चांदणे कुणाचं पसरलं नभात,

जणू पुंजके आठवणींचे पसरले मनात.

ओघळलं डोळ्यात एका चांदण्याचं पाणी,

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

 

हुळुवार भावना या जणू पाकळ्या फुलांच्या,

ठेवल्या सर्व जपून पुस्तकात आठवणींच्या.

सांगू कुणास मी ही हळवी जुनी गार्‍हाणी,

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

 

वाटे मनास माझ्या मी विसरून तुज गेलो,

भेटीच्या त्या क्षणांना मागे सोडून आलो.

भैरवीत भिजवून का हे मन गाई विरह गाणी,

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

 

बुधवार  - २३/७/२५ , ३:१९ PM

अजय सरदेसाई -मेघ


कवियत्री शांता शेळके यांच्या याच नावाच्या गीतावरून प्रेरित