गेलेले क्षण का परतणार
आहेत!
सांगुन का तुला हे कळणार आहे?
क्षण गेलेले सुंदर,आठवांतच फुलणार आहेत,
त्यांच्याच सोबतीने जीवनाचा प्रवास खुलणार आहे.
उमलले ले फुल किती जगणार आहे?
सुगंध उधळुन ते कोमेजणार आहे.
स्वप्न किती काळ टिकणार आहे?
उघडताच डोळे, स्वप्न ते विरणार आहे.
कितीही जपले तरी ते निसटणार आहे,
हेच जिवन आहे,कधीतरी ते संपणार आहे.
शुक्रवार, १५/८/२५, ६:४७ PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment