प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday 8 September 2013

एका प्रेमाची गोष्ट



विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा

जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा

आठवतो मज दिवस तो पहिलाजेव्हा आवळा परिचय झाला

परिचयाच्या वाटेवरुनी,प्रेमाचा अंकुर उमलला

प्रेमाचा हा अंकुर बहरला,बाहेरून शुभमंगल झाला

आठवतो मज अजून सारखा,मिलनाचा तो क्षण पहिला

प्रेमाचा हा तरु मोहरलाआल्या त्याला नव्या पालव्या

आठवतो अजून दिवस तो मजला,दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला

सुखी आपला संसार चांगला,नजर लागली कसा बिघडला

गेलीस  तू सोडून अर्ध्यावरजो सुंदर आपला डाव मांडला

तरीही हा चिमणा एकाला,पाखरांसाठी जगाला श्रमला

उडुनी गेली पाखरें,आता चिमणा राहिला  एकला

विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा

जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा

 

अजय सरदेसाई (मेघ)

१४/०९/१९९४ , ०८:३० PM

No comments:

Post a Comment