प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 8 June 2026

सूर येती..., विरून जाती...


 



सूर येती... विरून जाती...
उरतात कंपने,..वाऱ्यावरी...,
हृदयावरी...
सूर येती... विरून जाती...

कोण स्वामी... या स्वरांचा,
सूर कुठून येती?
संमोहीत ही धरा...
संमोहीत राने होती.

वेणूचे सूर पडताच कानी...
मन, हृदय विरघळले,
त्या सूरांवर पहुडून सारे—
वृंदावन विहरले.

सूर येती... विरून जाती...
सूरांचीs.. सुप्त स्पंदने,
सप्तचक्रांत वसली,
नाद अनाहत उठता...,
भुजंगिनी......
जागृत झाली॥

मंगलवार, ९/६/२६ , ८:५५ AM
अजय सरदेसाई -मेघ

शांता शेळके यांच्या याच नावाच्या मुळ गीतावरुन स्फुरलेले,
 पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कंपोज केले आणि भारत रत्न लता दीदींनी गायलेले! 

No comments:

Post a Comment