सूर येती... विरून जाती...
उरतात कंपने,..वाऱ्यावरी...,
हृदयावरी...
सूर येती... विरून जाती...
कोण स्वामी... या स्वरांचा,
सूर कुठून येती?
संमोहीत ही धरा...
संमोहीत राने होती.
वेणूचे सूर पडताच कानी...
मन, हृदय विरघळले,
त्या सूरांवर पहुडून सारे—
वृंदावन विहरले.
सूर येती... विरून जाती...
सूरांचीs.. सुप्त स्पंदने,
सप्तचक्रांत वसली,
नाद अनाहत उठता...,
भुजंगिनी......
जागृत झाली॥
मंगलवार, ९/६/२६ , ८:५५ AM
अजय सरदेसाई -मेघ
शांता शेळके यांच्या याच नावाच्या मुळ गीतावरुन स्फुरलेले,
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कंपोज केले आणि भारत रत्न लता दीदींनी गायलेले!

No comments:
Post a Comment