वाळूचे कण, करोडों, तरी वेगळे,
काळाचे क्षण, अब्जों, तरी वेगळे।
एकाच सागरातील लाटा साऱ्या,
तरी किनारी उमटती ठसे वेगळे॥
काळाचे क्षण, अब्जों, तरी वेगळे।
एकाच सागरातील लाटा साऱ्या,
तरी किनारी उमटती ठसे वेगळे॥
आभाळातील तारे, अगणित जरी,
ओळख त्यांची आभाळापल्याड नाही।
फुलबागेत रंग हजारो फुलांचे,
बागेतच त्या हजारो फुलांची राई॥
माणसेही अशीच, गर्दीत असंख्य,
प्रत्येकाच्या मनात कहाणी वेगळी।
माणसं तीच जरी, माणुसकी वेगळी,
माणसामाणसांतील दुनिया वेगळी॥
क्षणाक्षणांनी सरत जातो हा काळ,
तरी आठवणींची प्रत्येक सावली वेगळी।
जीवन एकच जरी, धरा एकच सारी,
तरी प्रत्येकाची जगण्याची वाट वेगळी॥
शुक्रवार, ४/९/२६, ५:४५ PM
अजय सरदेसाई — मेघ
