कधी मिळणार मला पुरस्कार माझा,
सुखात जगण्याचा अधिकार माझा।।
सुखात जगण्याचा अधिकार माझा।।
का ठरवतात आयुष्य ग्रह नि तारे,
का नेहमी संबंध त्यांचा नि माझा।।
शुक्र, शनि, रवी, मंगळ आसनस्थ आकाशी,
का ठरवतात आयुष्याचा वेग माझा।।
लग्न, नक्षत्र, रास, दशांची ही पचडी,
का गुंतवत राहते प्रत्येक मार्ग माझा।।
यांची युती अन् त्यांची शत्रुता म्हणे,
का बदलते वारंवार मार्ग माझा।।
कधी तो मार्गी तर कधी वक्री म्हणे,
यांची लुडबुड वाढवते वैताग माझा।।
दशमारिष्ठ पंचमारिष्ठ ग्रह पुजेतच,
ह्यातच दवडतोय सगळा वेळ माझा।।
हातांच्या रेषांवर विश्वास किती ठेवू,
अजून किती चालणार संघर्ष माझा।।
नशिबालाही कधी विचारावंसं वाटतं,
काय एवढा होता अपराध माझा।।
दैवाच्या नावाखाली थांबून राहू कशाला,
श्वासांत धगधगतो निर्धार माझा।।
अजय सरदेसाई - ‘मेघ’
शुक्रवार, १५/५/२०२६ — ९:०० AM

No comments:
Post a Comment